FB Cover Photo.
July 22, 2012 Leave a comment
|| Creating a Knowledge Lit World ||
August 5, 2011 2 Comments
Big leap in career –
Security Services to Customer Care Services.
Thanks MS-CIT
MS-CIT helped Sachin Pawar in achieving a BIG LEAP in his career.
While serving in “Security Services” team, Sachin did a MS-CIT course and now he is working as a “Customer Care Executive”.Isn’t it a BIG LEAP in his career and Life.
You may contact Sachin at +91-96893 90787 | eMail: sachinpawar.1@rediffmail.com
August 4, 2011 Leave a comment
महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची यशस्वी वाटचाल
भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय श्री. राजीव गांधी यांनी संगणक क्रांतीचा पुरस्कार करुन २१ व्या शतकातील ज्ञानाधिष्ठित विकासाची संकल्पना भारताला दिली. त्यांच्या २१ व्या शतकातील पहिल्या जन्मदिनाचे औचित्य लक्षात घेऊन दिनांक २० ऑगस्ट २००१ रोजी, महाराष्ट्र शासनाने समाजातील डिजिटल दरी दूर करुन व्यापक प्रमाणावर संगणक साक्षरतेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित’ तथा MKCL या संस्थेची स्थापना केली. MKCLने ज्ञानयुगातील विकासाच्या नवनवीन संधी माहिती तंत्रज्ञानाच्या समुचित वापरातून महाराष्ट्रातील सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. या प्रयत्नातून नव्या परिवर्तनशील ई-शिक्षणाचे अभिनव प्रारूप साकारत आहे आणि त्याला आपल्या देशात व परदेशात उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ई-शिक्षणाबराबरच महामंडळाने अभिनव ई-प्रशासन सेवा व ई-सबलीकरण सेवा राज्यात सर्वदूर उपलब्ध करुन लक्षावधी नागरिकांना डिजीटल तंत्रज्ञानाचे फायदे दैनंदिन जीवनात घेण्याची संधी प्राप्त करुन दिली आहे. या वर्षी MKCL आपल्या यशस्वी वाटचालीचे पहिले दशक पूर्ण करुन दुस-या दशकात पदार्पण करीत आहे. यापुढेही MKCLद्वारे महाराष्ट्राच्या व देशाच्या शैक्षणिक, सामजिक आणि औद्योगिकक्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाच्या वापरातून सर्वांगीण विकास साधण्याचे बहुमोलाचे कार्य अविरत चालू राहिल…..
महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची यशस्वी वाटचाल
MKCL चे राज्यव्यापी महानेटवर्क
- संपूर्ण महाराष्ट्रात संगणक प्रशिक्षणाकरिता ५०००+ अधिकृत अध्ययन केंद्रांचे महानेटवर्क.
- अद्ययावत हार्डवेअर व सॉफ्टवेअर्सने सुसज्ज असलेले ४०००० इंटरनेट-रेडी संगणकाचे राज्यव्यापी जाळे.
- राज्यातल्या शहरी, निमशहरी, ग्रामीण, आदिवासी व डोंगराळ भागांतही नेटवर्कमार्फत सक्षम ई-लर्निंग, ई-प्रशासन व ई-सबलीकरण सेवा व सुविधांचे वितरण.
- ई-लर्निंग, ई-गव्हर्नन्स व ई-एंपॉवरमेंट क्षेत्रात राज्यव्यापी सेवा देण्यासाठी पायाभूत सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ व बौद्धिक संपदा निर्मिती.
- दहा वर्षात महानेटवर्कची रु.१३९० कोटींची उलाढाल.
- नेटवर्कमार्फत आजपर्यंत १ कोटी २५ लाखांपेक्षा जास्त लोकांना शिक्षण-प्रशिक्षण, सेवा आणि ई-सुविधा.
विविध उपक्रम व सेवा
- ६० लाखापेक्षा जास्त जिज्ञासूंना गेल्या दहा वर्षांत MS-CIT या माफक शुल्कातील, अद्ययावत व परिपूर्ण कंप्यूटर साक्षरता कोर्समार्फत दर्जेदार प्रशिक्षण व त्यामार्फत महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे संगणक साक्षर राज्य बनविण्यात यश.
- वर्ल्ड क्लास अॅकॅडमी फॉर व्होकेशनल एक्सलन्स (WAVE) अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रमाणित रोजगाराभिमुख व्यावसायिक प्रशिक्षण देणारे अनेक नवे अभ्यासक्रम.
- डिजीटल युनिव्हर्सिटी प्रकल्पामार्फत १२ विद्यापीठांतील १२ लाख विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रशासकीय व शैक्षणिक ई-सुविधा.
- ‘ओअॅसिस’ या संगणक प्रणालीतून ३८ लाख विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांचे सुलभ ऑनलाईन प्रवेश व १३ लाख उमेदवारांना शासकीय सेवा – प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा व माहिती सेवा.
- ‘डिजीटल स्कूल’ या शालेय ई-शिक्षण प्रणालीला राष्ट्रीय पातळीवरील मानाचा eIndia पुरस्कार.
- ‘टॅलेंट नर्चरन्स’ या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या उत्तमता विकास व प्रज्ञा संवर्धनासाठी विज्ञान व गणित ऑलिंपियाड अभियान, आंतरराष्टीय विज्ञान ऑलिंपियाडमध्ये भारतीय टिममध्ये प्रतिनिधित्व.
- ६ ते ८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या बहुविध बुध्दिमत्ता विकासासाठी राज्यभर ‘हॉबी होम्स’ ची निर्मिती.
- ‘सेटस्’ सॉफ्टवेअर प्रणाली मार्फत विविध शासकीय महामंडळांना प्रतिवर्षी हजारो कोटी रुपयांच्या वस्तू व सेवा खरेदीसाठी ई-टेंडरिंग सेवा.
- राजस्थान राज्य सरकारसोबत राजस्थान नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना. राजस्थानातील १,४०,८०० विद्यार्थी संगणक प्रशिक्षित.
- ओरीसा नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (OKCL) साठी ओरीसा सरकारची मान्यता
- गुजरात, कर्नाटक व गोवा राज्यांच्या माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी श्रम मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे MKCL ची परीक्षण संस्था म्हणून निवड
- देशातील १७ राज्यांमध्ये MKCL अभ्यासक्रम स्थानिक भाषांतून कार्यान्वित.
- सौदी अरेबिया मध्ये ‘एम.के.सी.एल. अरेबिया लिमिटेड’ ची स्थापना. १० हजार सौदी विद्यार्थी संगणक प्रशिक्षित.
- सिंगापूर आणि घाना या देशामध्ये MKCL– सिंगापूर आणि MKCL– घाना या संयुक्त संस्थांसाठी सामंजस्य करार
- ‘एम्प्लॉयमेंट असिस्टंटस् सर्व्हीसेस टू यूथ – EASY’ पोर्टल मार्फत तरुणांना रोजगार, शिष्यवृत्त्या, स्पर्धा परीक्षा तयारी, इ. सुविधा.
रोजगार निर्मिती
- राज्यभर शहरी, निमशहरी व ग्रामीण भागातील २५ हजार युवकांना MKCL नेटवर्कमध्ये त्यांच्याच गावात माहिती तंत्रज्ञानावर आधारित हाय-टेक रोजगार व स्वयंरोजगार.
- १ लाख युवकांना अप्रत्यक्षरित्या एम.के.सी.एल. नेटवर्कमध्ये त्यांच्या गावात रोजगार/व्यवसायाव्दारे उपजिविकेच्या संधी.
August 3, 2011 2 Comments
MKCL Highlights
~ Celebrating the Decade of Digital Empowerment
Capacity Building
- Network of 5000+ Authorized Learning Centers in the state well equipped with more than 40, 000 computers with state-of-the-art hardware, software and internet connectivity
- Huge capacity building and enrichment of infrastructural, financial, human and intellectual resources for the state for providing learning, governance and empowerment services to people
- Network Coverage in all metropolitan, urban, semi-urban, rural, tribal and hilly areas of the state
- Network Coverage in all districts and tehsils of the state
Services to the People
- 6 million+ youth in the state were given state-of-the-art IT Literacy Training through MKCL’s MS-CIT course in last nine years at affordable cost
- Providing job-oriented vocational training in 25 disciplines to the youth through MKCL’s World-class Academy for Vocational Excellence (WAVE)
- Providing direct student facilitation services to 1.2 million University students in 2800 Colleges under 14 universities in the state through MKCL’s Digital University® Framework
- More than 2 million youth have been given Online Admission and Online Government Recruitment Services across the state through MKCL’s OASIS Framework
- Nurturance of Excellence and Talent for Science and Mathematics Olympiad for School Children
- Network of Prayog Parivar Kendra for School Children
- Network of Hobby Homes in the state for Multiple Intelligences development of Children
- Managed eTendering services through MKCL’s eTendering technology for 10000+ tenders worth Rs. 26 Billion+ .
- Establishment of Rajasthan Knowledge Corporation Limited in collaboration with Government of Rajasthan
- Establishment of MKCL Arabia Limited at Riyadh for propagation of IT education and MKCL’s other programs in Kingdom of Saudi Arabia
Employment Generation
- 25,000 youth in the state got direct high-tech employment and self-employment opportunities in this network with decent and stable income at their own native places without migrating to Mumbai, Pune or nearby cities.
- 1,00,000 youth in the state got indirect job opportunities in this network at their own native places
July 21, 2011 Leave a comment
FREE ONLINE DOWNLOADABLE BOOKS:
Courtesy : http://www.e-booksdirectory.com
Information Shared by MKCL Libreria – http://www.mkcl.org/libreria
- Arts & Photography
ArchitectureDesign & Decorative ArtsDrawingFashionHistory & CriticismPaintingPhotographyReligiousSculpture- Biographies & Memoirs
HistoricalLeaders & Notable PeopleMemoirsProfessionals & Academics- Business & Investing
AccountingBanks & BankingCommunicationsEconomicsFinanceIndustries & ProfessionsInternational BusinessInvestingJob Hunting & CareersManagement & LeadershipMarketing & SalesSmall Business & Entrepreneurship- Children’s Books
AudiobooksLiterature- Comics & Graphic Novels
Cartooning- Computers & Internet
Business & CultureCertification CentralComputer ScienceDatabasesDigital MusicGraphic DesignHardwareHome ComputingMicrosoftNetworkingOperating SystemsProgrammingSoftwareWeb Development- Cooking, Food & Wine
Culinary Arts & TechniquesReference- Engineering
AerospaceBioengineeringChemicalCivil EngineeringElectrical & Electronic EngineeringEnvironmental EngineeringIndustrial EngineeringMaterials ScienceMechanical EngineeringReference- Entertainment
HumorMusicPuzzles & Games- Health, Mind & Body
Diets & Weight LossDisorders & DiseasesExercise & FitnessMental HealthPersonal HealthPsychology & CounselingRecoveryReferenceRelationshipsSafety & First AidSelf-HelpSex- History
AfricaAncientAsiaEuropeMiddle EastMilitary ScienceUnited StatesWorld- Humanities
English as a Foreign LanguageForeign LanguagesLinguisticsPhilosophy- Law
Civil RightsEmigration & ImmigrationHuman RightsIntellectual PropertyInternational Law- Literature & Fiction
ClassicsContemporaryDramaGenre FictionHistory & CriticismLiteraryPoetryShort StoriesWorld LiteratureWriting Skills- Mathematics
Abstract AlgebraAnalysis & CalculusAppliedCategory TheoryDiscrete MathematicsElementary Algebra & TrigonometryGeometry & TopologyHistoryLinear AlgebraPopularProbability & StatisticsPure MathematicsStudy & Teaching- Medicine
Administration & PolicyAnatomyAudiology & Speech PathologyDiseasesEmergency MedicineGeneticsImmunologyInternal MedicineMilitaryNutritionObstetrics & GynecologyOphthalmologyPediatricsPharmacologyPhysician & PatientPhysiologyPreventive MedicinePsychiatryPublic HealthReferenceSurgery- Nonfiction
AviationCrime & CriminalsEducationPoliticsSocial Sciences- Outdoors & Nature
Hiking & CampingHunting & FishingReference- Religion & Spirituality
ChristianityHinduismIslamJudaismMysticismOther Eastern ReligionsReligious Studies- Science
Agricultural SciencesAstronomyBiologyChemistryEarth SciencesPhysicsSystems TheoryTechnology- Science Fiction & Fantasy
FantasyScience Fiction- Travel
AfricaAsiaAustraliaCaribbeanEssays & TraveloguesEuropeMiddle EastNorth AmericaSouth America
FREE ONLINE DOWNLOADABLE BOOKS:
Courtesy : http://www.e-booksdirectory.com
Information Shared by MKCL Libreria – http://www.mkcl.org/libreria
Released in Public Interest by MKCL
July 18, 2011 Leave a comment
ज्ञानशक्ती
“एकविसावे शतक हे ज्ञानाचे शतक आहे. मानवी समाज कृषिप्रधान सभ्यता व संस्कृतीतून उद्योगप्रधान व माहितीप्रधान अवस्थांमध्ये गेल्या काही शतकात संक्रमित झाला. एकविसाव्या शतकात तो ‘ज्ञानप्रधान’ सभ्यता व संस्कृती निर्माण करत आहे.
ज्ञानाधिष्ठित उद्योग, ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था व ज्ञानाधिष्ठित समाज हे या शतकाचे परवलीचे शब्द होत आहेत. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी व्यक्तींना, समूहांना, राष्ट्रांना नवनवीन ज्ञान आत्मसात करण्याची पूर्वी कधीही नव्हती एवढी नितांत आवश्यकता या शतकात भासत आहे. व्यक्तींच्या, समूहांच्या राष्ट्रांच्या आणि एकंदर मानवी समाजाच्या अस्तित्वासाठी ज्ञान, विकासासाठी ज्ञान आणि आत्मसन्मानासाठी ज्ञान अशी ज्ञानाची त्रिसूत्री या शतकात सिध्द होत आहे.
गेल्या दोन शतकांत श्रीमंत देश अधिकाधिक श्रीमंत होत गेले ते त्यांनी केलेल्या नवीन ज्ञानाच्या प्रचंड निर्मितीमुळे. केवळ विज्ञान-तंत्रज्ञानच नव्हे तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रांना स्पर्श करणा-या ज्ञानशाखांमध्ये अत्याधुनिक ज्ञानाच्या निर्मितीचा त्यांनी ध्यास घेतला. हे नवीन ज्ञान समाजातल्या भेदाभेदांना पार करत सर्व स्तरांपर्यंत सतत वेगाने वितरित करण्याचा महाप्रयास केला. हे नवीन ज्ञान जुन्या उपयुक्त ज्ञानाशी जोडत, जुन्या-नव्याचं एकात्मिक व्यवस्थापन केलं. सर्वसामान्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देत या नवीन ज्ञानाचा आर्थिक व सामाजिक विकासासाठी सतत परिणामकारकपणे वापर केला. नवीन ज्ञानाची इंटरनेटद्वारे जोडलेल्या लोकसमूहांच्या सहभागातून सहनिर्मिती, वितरण, व्यवस्थापन आणि उपाययोजना अशा विशिष्ट विकासनीतीतून वर उल्लेखिलेल्या त्रिसूत्रीने आकार घेतला.
ज्ञानाधिष्ठित अशा या विलक्षण संरचनेमध्ये कच्चा मालही ज्ञान व पक्का मालही ज्ञानच. नवी उत्पादने व नव्या सेवांचा मुख्य आशय ज्ञानच. त्यातील भौतिक आशय कमी होत जाऊन त्याची जागा ज्ञान घेत आहे आणि तीही कमालीच्या वेगाने. मोबाईल फोनची जी किंमत आपण मोजतो ती त्याच्यातील पदार्थांच्या वजनासाठी नसून त्यामागील विज्ञान, तंत्रज्ञानाच्या बौध्दिक संपदेसाठी म्हणजेच मुख्यत्वे नवकल्पनांच्या आणि ज्ञानाच्या आशयासाठी आहे. जशी कच्च्या मालाची जागा ज्ञान घेत आहे तशीच शारीरिक श्रमाची जागाही बौध्दिक श्रम घेत आहेत. आर्थिक भांडवलाची जागा कर्मशील स्वरुपातील ज्ञान-भांडवल घेत आहे आणि भौतिक किंवा आर्थिक मालमत्तेपेक्षा बौध्दिक मालमत्तेला महत्व प्राप्त होत आहे.
या ज्ञानयुगात आपली प्रगती करुन घेण्यासाठी प्रत्येकाला केवळ पूर्वीच्या तुटपुंज्या ज्ञानावर व तथाकथित अनुभवांवर विसंबून न राहता रोज नवे आणि कर्मशील ज्ञान संपादन करावे लागेल व उपयोगात आणावे लागेल. अशा निरंतर ज्ञानसाधनेला जर पर्याय नसेल तर आपणा सर्वांना आजन्म विद्यार्थी व्हावे लागेल. मग आपण विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, श्रमिक, कामगार, कारागीर, व्यावसायिक, उद्योजक, संशोधक, कलावंत, पुढारी, व्यवस्थापक, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, इत्यादींपैकी कोणीही असा.
समाजाच्या अशा सर्व घटकांना आजन्म ज्ञानसाधनेसाठी, ज्ञानाधिष्ठित दैनंदिन व्यवहारांसाठी आणि केवळ लिखितस्वरुपातीलच नव्हे तर जगातील व्यक्तींच्या जाणिवांमधील जिवंत ज्ञानाच्या त्वरित देवाण-घेवाणीसाठी अतिशय सुलभ, स्वस्त, ग्रामीण आदिवासी-दुर्गम भागांपर्यंत सर्वदूर पोहोचू शकणा-या, कार्यक्षम, परिणामकारक आणि द्रुतगती मार्गाची, साधनांची गरज आहे. असा अभिनव आणि कदाचित एकमेव मार्ग म्हणजे संगणक व इंटरनेट यांच्या अफलातून युतीतून-माहिती-तंत्रज्ञानातून-साकार झालेला डिजिटल, व्हर्च्युअल आणि ग्लोबल ज्ञानमार्ग. या अभिनव ज्ञानमार्गाची कास तुम्हां-आम्हांला अनिवार्यपणे धरावी लागेल. त्यामुळे, माहिती-तंत्रज्ञान हा केवळ शालेय किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमातला एक छोटासा (कदाचित् ऑप्शनला टाकून बाजूस सारण्याचा किंवा परीक्षेनंतर विसरुन जाण्याचा) विषय नाही. केवळ मुलांनी व तरुणांनीच नोकरीसाठी कसाबसा एकदाचा शिकण्याचा किंवा शहरातील व महानगरांतील पांढरपेशांनी परदेशांत स्थायिक होण्यासाठी सक्तीने अभ्यासण्याचा विषय नसून तो आपल्या सर्वांच्या आणि विशेषत: ग्रामीण भागांतील युवकांच्या विकासाचा व उन्नतीचा महामंत्र आहे.
महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने हा मंत्र आपल्या MS-CIT अभ्यासक्रमाद्वारे समाजाच्या सर्व घटकांपर्यंत व विशेषत: ग्रामीण भागांपर्यंत पोहोचविला आहे. आपल्या देशाला ज्ञानयुगातील समृध्द देश बनविण्यासाठी अशा पायाभूत प्रयत्नांची नितांत आवश्यकता आहे. माहिती-तंत्रज्ञान हे गावात सारे विश्व आणणारे आणि सा-या विश्वाचे एक गाव (Global Village) करणारे क्रांतिकारी तंत्रज्ञान आहे. त्यात जागतिक पातळीवर मूलभूत असे आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक परिवर्तन वेगाने घडवून आणण्याची प्रचंड क्षमता आहे. ते केवळ तंत्रज्ञान नसून ज्ञानयुगातील अपरिहार्य अशी जीवनपध्दती बनू पाहत आहे. सर्वसामान्यांच्या माहिती-तंत्रज्ञान साक्षरतेला म्हणूनच अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
माहिती-तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गेल्या दशकात प्रचंड संपत्तीची निर्मिती भारतात झाली. एवढ्या प्रमाणात संपत्तीची निर्मिती विशेष कौटुंबिक व आर्थिक पाठबळ नसलेल्या वर्गाकडून यापूर्वी कधीही झाली नव्हती. परंतु ही संपत्ती व हे तंत्रज्ञान मूठभरांच्या हातात राहिले व अर्थातच त्याचे फायदेही केवळ त्यांनाच मिळाले. यामागील एक प्रमुख कारण हे की, माहिती-तंत्रज्ञान मुख्यत्वे महानगरांत व शहरांत, इंग्रजी भाषेत व माहिती-तंत्रज्ञान उद्योगाला निर्यातीसाठी तज्ज्ञ मनुष्यबळ पुरविण्यापुरते सीमित राहिले.
आपल्या देशातील विशेषत: ग्रामीण भागातील, इंग्रजी अवगत नसलेल्या ७०% हून अधिक जनतेला निर्यात उद्योगात नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनात या तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याची व ज्ञानयुगात झेप घेण्याच्या आपल्या विकासक्रमातील त्या तंत्रज्ञानाच्या महत्वपूर्ण भूमिकेची जाणीव होऊ शकली नाही. आर्थिक व सामाजिकदृष्ट्या वंचित असा मोठा समाजघटक तसेच ग्रामीण भाग या तंत्रज्ञानाच्या फळांपासून वंचित राहिला. हा डिजिटल डिव्हाइड आपल्या देशाला समृध्द बनविण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या साक्षरतेचा अल्पशिक्षित ग्रामीण जनतेमध्येही म्हणूनच हिरिरीने प्रसार केल्यास आपला देश डिजिटल-व्हर्च्युअल-ग्लोबल ज्ञानमार्गावर गतिमान बनेल व आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक विकास साधू शकेल.”
विवेक सावंत,
मॅनेजिंग डायरेक्टर, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ
md@mkcl.org